Sunday, October 17, 2010

.... आज पुन्हा ....



आज पुन्हा मला तुझी आठवण झाली,
आज पुन्हा मनात... त्या जुन्या क्षणांची साठवण झाली...

आज पुन्हा मी काहीतरी विसरलो,
आज पुन्हा मी तुझ्या विचारांत हरवलो...

आज पुन्हा तुला भेटावसं वाटलं,
आज पुन्हा तुझ्या बरोबर बोलावसं वाटलं...

आज पुन्हा चुकल्यासारखा मला जाणवलं,
आज पुन्हा माझं मन दुखावाल्यासारखं काहीसं घडलं...

आज पुन्हा in-box मधले तुझे mails वाचले,
आज पुन्हा तुझ्या calls ची वाट पाहिली...

आज पुन्हा मित्रां मध्ये मी एकटाच राहिलो,
आज पुन्हा मी एकट्यातच रडलो...

आज पुन्हा तू मला समजून न घेतल्याचा मला वाईट वाटलं,
आज पुन्हा कोणीच सोबती नसल्यासारखं मला वाटलं...

आज पुन्हा दिवसभारात काही नवीन नाही घडलं,
आज पुन्हा मी दिवसाला काल सारखंच संपवलं ....   

“आपण कोणाचा मुलगा व्हावं हे आपल्या हातात नसतं “…

“आपण कोणाचा मुलगा व्हावं हे आपल्या हातात नसतं “…


“आपण कोणा famous personality चा मुलगा व्हावं हे आपल्या हातात नसतं … पण आपला बाप किती famous व्हावा हे आपल्याच हातात असतं” ….
 
खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही …  म्हणजे आपण नेहमीच बोलत असतो की, ” जर माझा बाप कोणी श्रीमंत माणूस असतं तर असं झाला असतं … मी असं केलं असतं …. कोणी भरपूर famous व्यक्ती असता तर … तर मी ही लवकर famous झालो असतो” … पण आपण असं का म्हणतो असा विचार आपण कधीच नाही करत …. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास स्वामी हे कधी असा कोणाला म्हटले असतील? कधी असा विचार शिवाजींनी केला असेल??? टिळकांनी, गांधीजीनी, स्वामी विवेकानंद, अ.पा.ज. अब्दुल कलामांनी केला असेल? Einstein, Bill Gates , Sir Richard Branson यांनी तरी कधी केला असेल? अजून किती तरी आहेत असे famous व्यक्ती जे नाही थांबले, जे नाही रडले …. की कोण आपला बाप आहे … कुठे कुठे आपल्या बापाची ओळख आहे … अजून बरंच काही ….. त्यांनी स्वताचा नाव कमवलं…. त्यांनी स्वताच इतिहास घडवला…. स्वतः मेहनत घेतली ….

मग!! आपणच का असा विचार करत असतो नेहमी …. आपल्याला का सगळ्या गोष्टी अगदी सोप्या पाहिजे असतात? आपणही का तयार नसतो त्यांच्या सारखी मेहनत घ्यायला … माझ्या मते तरी एवढंच कारण असेल की आपण घाबरतो ….. कशाला? … कोणाला? ….. आपण घाबरतो ….. आपण घाबरतो मेहनत घ्यायला… आपण घाबरतो कष्ट करायला… आपण घाबरतो स्वताला …. आणि अजून म्हणजे स्वतापेक्षा जास्त आपण घाबरतो “बाकीच्यांना.... लोकांना” … मी जर हरलो तर?? काय म्हणतील सगळे?? माझ्यावर हसतील …. मला चिडवतील …

आपल्या ला जगायचं आहे ते कोणासाठी?? … त्या लोकांसाठी?? … की … आपल्या साठी आत्ता पर्यंत आपल्या साठी जगलेल्या …  आपल्या घरातल्या लोकांसाठी  … स्वतासाठी … आपण तेच पहिलं ठरवायला पाहिजे ….

 

Sunday, October 10, 2010

.... बे चा पाढा ... ( rap 2 Angry young man type :D )




बे एके बे,
बे दुने चार,
अपुन को तेरेको बोलणे का है ....
I love you यार ...

बे त्रिक सहा,
बे चौक आठ,
हो म्हण नाहीतर ....
मी लावून टाकेन वाट ....

बे पंचे दहा,
बे सक बारा,
माझ्यासारखा dashing hero ...
तुला भेटणार नाही दुसरा ....

बे साती चौदा,
बे आठी सोळा,
famous आहे area मध्ये ...
आहे मी पोरगा साधा भोळा ...

बे नवे अठरा,
बे दाहे वीस,
कोणी दुसरा असेल तर नाव सांग ...
त्याचे करतो cut piece ....



.... बे चा पाढा ( rap )...



बे एके बे ,
बे दुने चार ...
वेडा झालो मी ...
जेव्हा पाहिलं तुला यार ....

बे त्रिक सहा ,
बे चोक आठ ,
रात्रं दिवस करत राहतो तुझाच विचार ...
मला वाटतं आता लागली माझी वाट ... 

बे पंचे दहा ,
बे सक बारा ,
प्रेमाबिमाचा लफडा ...
वाटतो मला हा सारा ....

बे साती चौदा ,
बे आठी सोळा ,
फसवणार नाही तुला कधीच...
आहे मी साधा भोळा ... 

बे नवे अठरा,
हो म्हण मला ...
माझा करू नको बकरा ...

नाही म्हणशील मला तर ...
नंतर करत राहशील मला miss ...
आहे बे दाहे वीस ....



..... राहिलं नाही ....




भरपूर मोठ्या रस्त्या वरून चाललोय ...
सोबती मात्र कोणी नाही ....

कुठेतरी शेवट असेल म्हणून चाललोय ....
पायांत ताकात मात्र अजिबात राहिली नाही ....

आयुष्य बाकी आहे म्हणून जगतोय ....
जगायची इच्छा मात्र राहिली नाही ....

मित्र आहेत .... बरेच आहेत ...
मैत्री मात्र राहिली नाही ....

प्रेमात पडलोय म्हणून प्रेम आहे ....
प्रेमावर विश्वास मात्र राहिलेला नाही ...

नाती आहेत म्हणून नातेवाईक आहेत ...
नात्यांतले संबंध मात्र राहिले नाही ....

घड्यालाहे म्हणून time आहे ....
वेळ मात्र कोणाकडेच राहिला नाही ... 

मंदिर आहे म्हणून देव आहे ....
देवावर विश्वास मात्र राहिलेला नाही ....

दोन पायांवर चालतो म्हणून माणूस आहे ...
माणुसकी मात्र राहिलेली नाही....


Friday, September 24, 2010

.... Don't know ....

.... Don't know ....


Don't know where all my happiness had gone,
I'm carrying smile on my face...
but don't know since when...
I haven't smile...

Don't know where all my friends have gone,
we were going together...
I stopped for a moment ... 
& now I'm walking alone ...

Don't know where all my efforts have gone,
I tried hard for everything ...
but in the end... 
it all seemed ... useless...

Don't know where my love has gone,
we made some promises ...
she was never going to leave me ...
now I'm alone here waiting for her to return...

Don't know where all my dreams have gone,
they were here in my closed eyes,
but when I opened closed eyes ...
there only few water drops left ...

Don't know where this God have gone,
I seen him helping many people...
but when it comes my turn ...
I fount he isn't existing ....


Wednesday, September 15, 2010

.... आठवणीतला पाऊस .....

.... आठवणीतला पाऊस .....


आठवणींच्या आरश्यात जेव्हा ....
डोळ्यांतून पाण्याचे थेंब पडतात ....
त्या हलत्या आरशात मला ....
माझे दोन दोन चेहरे दिसतात ....

अश्रू होते का पाऊस ....
हे ओळखणेही अवघड जाते ....
अश्रू काय आणि पाऊस काय ....
पाहणार्याला दोन्ही सारखेच असते ....

बर्याचदा तुझ्या आठवणी ....
पावलं न वाजवताच येतात ....
जाताना मात्र मनाच्या रस्त्यात ....
तुझ्या पावलांचे ठसे मागे सोडून जातात ....

अवेळी आलेला पाउसही ....
सगळं उध्वस्त करतो ....
भर दुपारी भरल्या ढगांनी ....
काळोखी संध्याकाळ करतो ....


Tuesday, September 14, 2010

.... एकटा ....

.... एकटा ....


एकटा आलो मी,
एकटाच चाललो,
एकटा होतो मी,
एकटाच राहिलो...

सगळ्यांसोबत एकटा,
सगळ्यांशिवायही एकटाच,
गर्दीत एकटा मी,
मोकळ्या वाटेतही एकटाच...

एकटा बोलतो मी,
मी ... एकटाच ऐकतो,
कधी हसलो एकटा,
अन बर्याचदा एकटाच रडलो ...

होतो प्रवासात एकटा मी,
Destination ला पोहचलो ...
होतो तिथेही एकटाच,
दिवसाच्या उजेडात एकटा मी,
रात्रीच्या काळोखातही एकटाच ...

विचारांत एकटा,
प्रयत्नांत एकटाच,
हरल्यामुळे मी राहिलो एकटाच,
जिंकलो असतो तर काही काळ ... नसतो मी एकटा....

मित्रांत एकटा मी,
नात्यांत एकटा ...
दोघांतही एकटा मी...
सोबतीही माझा ... मी एकटाच ...

 एकटाच घरात मी,
दारातही एकटाच ....
काळजी माझी मला एकट्यालाच,
वाट पाहतो मी एकटाच ...

एकटाच जगलो मी,
एकटाच वाचलो,
.... एकटाच संपलो मी ....
शेवटपर्यंत एकटाच राहिलो ....


Tuesday, September 7, 2010

.... वाट बघता बघता ....

.... वाट बघता बघता ....


तुझी वाट बघता बघता ...
रस्ता तेवढा संपला,
तू तर आलीच नाहीस ...
पण अपघात मात्र घडला...

यायचंच नवथ तुला ...
हे मी समजून घ्यायला हवं होतं,
वेळ नसल्याचा तूझं कारण ...
मला genuine वाटलं होतं... 

तू सोबत असतीस ,
तर मला माझ्याही आधाराची गरज नवथी ,
तू फक्त सोबत असावी ,
एवढीच माझी इच्छा होती ...

मी तुझी वेड्यासारखी वाट पाहत होतो...
हे मला आत्ता पटलं ,
तुला मात्र अजूनही ...
माझं मन नाही कळलं ...

वाट पाहून तुझी ...
मला वाटतं आत्ता काही उपयोग नाही ....
पण या मनाला कोण समजावत बसणार ...
ते माझं ऐकतच नाही ....



Monday, September 6, 2010

.... वाट पाहतोय ....

.... वाट पाहतोय ...

वाट पाहतोय ...
त्या शब्दांची,
शब्दांतल्या त्या गोडव्याची,
न गायलेल्या काव्याची ....

वाट पाहतोय ...
तुझ्या सोबतीची ,
त्या मधुर हास्याची,
त्या बोलक्या नयनांची ...

वाट पाहतोय ...
तू येण्याची,
येऊन माझी होण्याची,
मिठीत माझ्या तू ....
सर्व काही विसरून जाण्याची ....

वाट पाहतोय ...
अवेळी येणार्या पावसाची,
जोराच्या त्या पावसाने ...
तुला भिजून टाकण्याची,
तूझं ओलं सुंदर रूप बघत राहण्याची ...

वाट पाहतोय ...
त्या स्पर्शाची ,
स्पर्शाताल्या त्या जाणीवेची,
माझ्या स्पर्शाने ...
तुझ्या अंगावर येणार्या शहार्याची ...

वाट पाहतोय ...
त्या क्षणाची,
त्या क्षणी असलेल्या एकांताची,
तू आणि मी आपण दोघेच ,
असू  जेव्हा .... त्या वेळेची....

वाट पाहतोय ...
त्या दिवसाची,
तू आणि मी ...
एकत्र होण्याची ...
पाहिलेल्या स्वप्नांना ...
खरोखरचे जगण्याची ....

Tuesday, August 31, 2010

....गोष्ट एका राजकन्येची ....

                                               ....गोष्ट एका राजकन्येची ....




         Blog वर मी आत्तापर्यंत नेहमी कविताच लिहित आलो ...एवढ्या कविता लिहून मला तर कवी असल्यासारखंच वाटायला लागलंय ... :) ... आजकाल मी तर बोलता बोलता पण कविता करायला बघतो ... प्रत्येक वाक्याच्या शेवटी rhyming words जोडून लावतो ... :D म्हणूनच मला आज एक गोष्ट लिहावाशी वाटते ... "गोष्ट एका राजकन्येची "....  गोष्ट लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे .... तेव्हा आधीच सांगून ठेवतो ... चूकभूल माफी ... आणि काही चांगलं वाईट असेल तर कृपया comment करा .... :)


          एका छोट्याशा गावात एक राजा राज्य करीत होता. त्याला राणी, राजपुत्र आणि दोन राजकन्या होत्या. पण सगळ्यात छोटी जी राजकन्या होती ती त्यांच्या घरात सगळ्यात लाडकी होती. ती अगदी साधी राहाणारी, थोडीशी खोडकर पण भरपूर हुशार आणि मेहनती होती. ती त्या राज्यात देखील सगळ्यांची लाडकी होती. तिच्या भरपूर मैत्रिणी देखील होत्या तिथे.
           एकदा राजाला वाटलं कि आपल्या या छोट्याश्या राजकन्येने भरपूर मोठी योद्धा व्हावं. आपल्या राज्कुमारासोबातच तिने देखील आपल्या राज्याचा विस्तार करावा.... वगैरे, वगैरे... जे सगळ्याच आई वडिलांना आपल्या मुलांबद्दल वाटतं ते त्यांना देखील वाटत होतं. त्यासाठी त्यांनी त्या राजकन्येला लढाई चं शिक्षण घ्याला राज्याबाहेर ... दुसर्या राज्यात पाठवायचं ठरवलं. राजकन्येने हि त्यासाठी होकार दिला.
           वेगळे राज्य, नवीन मित्रा मैत्रिणी ... पण आई बाबांपासून दूर ... त्यामुळे ती थोडी अस्वस्थ होती पण पण तिच्यात लढाई शिकण्याची, बाबांचा स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती, म्हणून आपल्या आवडी-निवडी, आपला comfort या सर्वांशी compromise करून ती तिथे होती. 
           अचानक एके दिवशी तिथे तिचा अपघात झाला. बर्याच जखमा झाल्या तिला, बराच रक्त पण वाहून गेला होतं तिचं. त्यासाठी तिला बराच काल आराम घ्यावा लागणार होता. म्हणून तिला पुन्हा तिच्या राज्यात पाठवलं. आता आपल्या बाबांचा स्वप्नं कसं पूर्ण करायचं? मी ते पूर्ण करू शकेन कि नाही याच विचारांत ती असायची. आपण त्यांच स्वप्न पूर्ण नाही करू शकणार या विचाराने तिने एकदा आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होतं. पण नंतर तिने स्वताला सावरलं. प्पुर्वी पेक्षा जास्त मेहनत घेण्याचा निर्णय तिने घेतला.
          काही दिवसांच्या विश्रांती नंतर ती पुन्हा शिक्षणासाठी त्या दुसर्या राज्यात गेली. तिथले तिचे सर्व जुने मित्र मैत्रिणी तिच्या पेक्षा भरपूर पुढे गेले होते. ते सर्व लढाईत तरबेज झाले होते. ते सर्व तिचे friends तिला विसरून गेले होते. ते तिचे friends राहिले नवथे. तेव्हाच त्या राजकन्ये ने ठरवलं कि मित्र मैत्रिणी काही नसतात, कोणीच नसतात ते आपले.... आपण एकटेच असतो. आपली लढाई ची हत्यारेच आपले खरे मित्र असतात. तेव्हा पासून तिने स्वताला त्या शिक्षणात हरउन बसली. पण असा बोलतात ना कि मन मोकळं करायला कोणीतरी लागतंच .. म्हणूनच तिची तिथे एका दुसर्या राजकन्ये बरोबर मैत्री झाली. ती तिची अगदी खास मैत्रीण बनली. अगदी जवळचीच. काही दिवसांत त्या राज्यातल्या एका साधारण व्यापार्या बरोबर तिची ओळख झाली ... काही दिवसांत चांगली मैत्री देखील झाली.
        राजकन्या लढाईत भरपूर हुशार झाली. अगदी निष्णात योद्धा झाली. लढाई चं शिक्षण संपून ती परत तिच्या राज्यात गेली. तिथे राजा ला तिच्या भावाला मदत करू लागली. त्यांनी भरपूर राज्या जिंकली. आणि अचानक एकदा तिची मैत्रीण तिच्या समोर येऊन थबकली. तिने तिच्या नवीन जिंकलेल्या राज्यावर हल्ला केला. राजकन्या तिच्या समोर नाही जिंकू शकली. तिची तिच्या सोबत लढाईची इचा सुद्धा नवती आणि स्वताचा सैन्य देखील तिने परत मागे बोलावून घेतले. तिने हार मान्य केली. तिने राजाला सांगून ते सर्व राज्य तिला देण्यास भाग पाडलं. आणि त्यांची मैत्री देखील तिथेच संपली.
        राजकन्या या धक्याने अगदी कोलमडून पडली. मनापासून अगदी तुटून गेली होती. तिला अगदी एकट पडल्यासारखा वाटू लागलं होतं. त्यामुळे तिने या सगळ्या लढाई वगैरे मधून थोडासा वेगळा होऊन काही काळ आराम करण्याचा निर्णय घेतला. अश्या परिस्थितीत तिला पुन्हा तिचा तो जुना व्यापारी मित्र भेटला. तोच एक आपला आधार असल्यासारखा राजकन्येला वाटू लागलं. ती नकळतच त्याच्या प्रेमात पडली. तिने त्या व्यापार्याला तसं सांगितलं. तो व्य्पारीदेखील तिला नाही म्हणू शकत  नवथा. कारण तिच्या अश्या परिस्थितीत तो तिला एकट सोडू शकत नवथा. म्हणून त्याने तिचं प्रेम मान्य केलं. दोघे कधी कधी भेटू लागले, आणि तो व्यापारीदेखील तिच्या प्रेमात पडत गेला. पण एक व्यापारी आणि एक राजकन्या दोघे एकत्र येणं जवळ जवळ अशक्यच आहे हे दोघेही ओळखून होते. मग राजकन्येने ठरवलं कि ती तिच्या बाबांचा स्वप्न पूर्ण करणार, त्यांच गेलेला राज्या परत मिळवणार... आणि मग त्यांची परवानगी मिळून घेणार. तेव्हा कोणीही त्यांना एकत्र येण्यापासून नाही अडवू शकत. आणि त्यासाठी त्यांनी तोपर्यंत वेगळं होण्याचा निर्णय घेतला, पण दोघांमध्ये पत्र व्यवाहार चालू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.आणि दोघे वेगळे झाले.
         बराच काळ लोटला. राजकन्येने तिच्या भावासोबत आणि वडिलांसोबत बरीच राज्य जिंकली. व्यापारीही दरम्यान बराच फामोउस झाला होता. बराच श्रीमंत झाला होता. तो नेहमीच राजकन्येला पत्र पाठवायचा. पण कधी राजकन्येचा उत्तर नाही आलं त्याला. राजकन्या बरीच व्यस्त असेल. तिने कधी पत्र वाचल्यावर, तिला वेळ मिळाल्यावर नक्कीच पत्र पाठवेल याच विश्वासाने तो पत्र पाठवतच राहिला. 
       एके दिवशी तो व्यापारी एका नवीन राज्यात व्यापार सुरु करण्यास गेला. तिथल्या राजाने त्याला आमंत्रण दिले होते. तो राजाच्या दरबारात गेला. यापाराच्या संदर्भात बोलणे झाल्यावर राजाने व्यापार्याला आपल्या राजमहालात भोजनासाठी आमंत्रण दिले. ते आमंत्रण स्वीकारून व्यापारी राजाच्या राजमहालात भोजनाला गेला. तिथे राजाने व्यापार्याची ओळख त्याची राणीबरोबर करून दिली. ती राणी म्हणजे तीच होती .... तीच ती व्यापार्याबरोबर प्रेम करणारी ती राजकन्या. व्यापारी समजून गेला होता. राजकन्येचा सोडन जाणं, त्याच्या पात्रांना उत्तर न देणं. त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. भोजनानंतर तो त्या राज्यातून निघून गेला. 
       त्याला भरपूर वाईट वाटत होतं. राजकन्येच त्याला प्रेमात पाडणं आणि नंतर त्याला सोडून जाणं त्याला सहन नाही झालं. तो त्याच विचारांत होता. समुद्रामार्गे एका जहाजातून प्रवास करत होता. त्याच वेळी वादळ आलं. व्यापार्याच जहाज त्या वादळात अडकलं आणि समुद्रात बुडून गेलं. व्यापारी त्यात नाही वाचू शकला... तो संपला...
           आणि या सोबतच बाकी सगळ्या story's सारखी या story ची देखील Happy Ending झाली. 
  आता तुम्ही म्हणाल कि happy ending कशी..?? हि गोष्ट कोणाची आहे??? त्या राजाकान्येचीच ना!! मग तो व्यापारी नाही राहिला म्हणजे तिच्या life मधला तो chapter संपलाच ना.... म्हणजे आता तिला उगीचची त्या व्यापार्याची येणारी पत्र नाही .... फुकटच त्याचं tension नाही ना... मग तिच्या साठी "Happy Ending"च ना... :D

 

Wednesday, August 18, 2010

...... मी प्रेमात पडलो ........

...... मी प्रेमात पडलो ........


त्या दिवशी मी,
प्रेमात पडलो,
बरंच लागलं,
पण रक्त ... जखम वगैरे काही नाही दिसलं....

तिने हसून माझ्याकडे पाहिलं,
आणि मी तिच्या डोळ्यातच हरउन  गेलो ...
तिच्या काळ्या काळ्या केसांत ....
मी स्वतः ला गुंतून बसलो ....

तेव्हा पासून मला Newton's Law ,
चुकीचा वाटायला लागला..
force of Gravity चा law लिहिताना,
तो थोडासा चुकला .... 

Apple झाडावरून सरळ....
जमिनीवरच पडलं,
पण प्रेमात पडल्यापासून....
मला हवेत असल्या सारखं वाटायला लागलं....

रात्रीच्या स्वप्नात...
तिला पाहिलंच ...
पण दिवस भर उघड्या डोळ्यात,
तिचंच स्वप्नं दिसत राहिलं ...

आज-काल मला पावसात भिजावंसं वाटतं ...
जुहू चौपाटी च्या वाळूवार चालावंसं वाटतं,
Bandstand वर तिच्या सोबत बसावंसं वाटतं ...
Hiranandani Gardens मधेय फिरावंसं वाटतं ...

त्या दिवसापासून मला ....
"कुछ कुछ होता है" वगैरे वाटयाला लागलंय ....
त्यात अजून काय तर ....
मला "दिल तो पागल है" सारखं गाणं पण
आवडायला लागलंय ....

तेव्हापासून माझं मन "Rocky " मधल्या संजय दत्त सारखं ...
 तिच्या शिवाय कुठेपण लागत नाही आणि वेळ पण जात नाही ...
मी "मोहब्बते" मधल्या जिम्मी शेरगिल सारखा ...
चालता चालता थांबतो ... तर बसल्या बसल्या कुठेतरी हरउन जातो ...

tweeter वर पण आज-काल मी फक्त ...
"Love Quotes"च tweet करतो....
माझा Facebook वरचा status पण ...
असाच काहीतरी असतो ....

दिवसा गुलाबी ढगांत ....
लाल लाल सूर्य मला भासतो ....
तर रात्री ... रंग बिरंगी .. तारे आणि चंद्रा सोबत ....
तिचाच चेहरा मला दिसतो ...

प्रेमात पडल्यापासून मी ....
जरा विचित्रच वागायला लागलोय ....
गप्पं गप्पं बसायला लागलोय ....
पण मनातल्या मनात ...
वादळांना सामोरे जायला लागलोय ....



Thursday, August 12, 2010

.... मी प्रेमातून पडलो ....


.... मी प्रेमातून पडलो ....


प्रेमात पडलो,
हवेत उडलो,
सोबत फिरलो,
movies ला गेलो,
देवळात आलो,
प्रेमगीते गायलो,
स्वप्नात रमलो,
ढगांत शिरलो,
तिच्यासाठी जगलो,
कितींदातरी  मेलो,
मागे मागे धावलो,
वेळेवर पोहचलो,
Platform वर थांबलो,
चौपाटी वर बसलो,
पावसात भिजलो,
तिच्या डोळ्यांत दिसलो,
तिच्या हसण्यात हरवलो,
केसांत गुंतलो,
स्पर्शात संपलो,
खरा समजलो,
खोटं बोललो,
थोडासा हसलो,
मनातच नाचलो,
तरी भरपूर रडलो,
ईशार्या ईशार्यांत खेळलो,
Arguments मध्ये हरलो,
बोलून बोलून दमलो,
Problems मध्ये फसलो,
लोच्यांत अडकलो,
लफडी जिंकलो,
पण राड्यांत पडायला थोडा घाबरलो,
रात्रभर जागलो,
Lecturer's ला झोपलो,
सोबत राहिलो,
कधीच एकटा नाही चाललो,
तिच्या शिवाय बाकी सगळं विसरलो,
मित्रांना नडलो,
घरातल्यांबरोबर भांडलो,
पण शेवटी ......
जेव्हा प्रेमातून पडलो ......
तेव्हा कुठे खरं प्रेम करायला शिकलो ....!!!

Tuesday, August 10, 2010

.... शेवटी भेटलं .....

.... शेवटी भेटलं .....

College मध्ये गेलो,
रात्रं-दिवस जागलो,
अभ्यास केला,
डिग्री मिळवली,
शेवटी हाती आली ..... बेकारी ......

ती आवडली,
तिलासुद्धा मी आवडलो,
प्रेम केलं,
फोन वर बोललो,
भरपूर फिरलो ,
ती सोडून गेली,
शेवटी राहिली ..... उदासी ....

job मिळवला,
लग्न केलं,
बाप झालो,
आजोबा झालो,
शेवटी भेटलं ....... म्हातारपण .....

रस्त्यात चालताना बरेच लोक भेटले,
त्यांना सगळ्यांसारखे आम्हीही "मित्र" म्हटले,
रस्ते बदलले,
मित्र बदलले,
मी रस्त्यात थांबलो,
मित्र विसरले,
शेवटी भेटला ..... एकटेपणा ....

हे केलं,
ते केलं,
सगळं केलं,
ह्यांचं .... त्यांचं ... सगळ्यांचं ऐकलं,
करता करता .... आयुष्य गेलं,
मरण आलं.....
शेवटी भेटलं........ !!!!!



Wednesday, August 4, 2010

.... मी तुझ्या सोबतच असेन ....


.... मी तुझ्या सोबतच असेन .....

काल पर्यंत मी तुझ्या सोबतच होतो....
आत्ताही मी तुझ्या सोबतच आहे ....
आणि नंतरही मी तुझ्या सोबतच राहील ....

उन्ह्याळ्यात तुझी तहान बनून,
पावसाळ्यात ढगांतून पडणार्या पाण्यात मी असेन,
आणि हिवाळ्यात थंडी बनून मी तुझ्या सोबत असेन...

उजेडात तुझी सावली बनून,
तर अंधारातल्या काळोखात मी असेल,
आणि एकटेपणात तुझ्या मनातला विचार बनून मी तुझ्या सोबत असेन...

हसताना तुझ्या गालावरची खळी बनून....
रडताना तुझ्या प्रत्येक अश्रूत मीच असेन...
आणि रागावशील तेव्हा लाल रंग बनून तुझ्या डोळ्यांत मीच असेन ....

बोलताना तुझ्या आवाजात,
तर लिहिताना तुझ्या प्रत्येक शब्दात मी असेन,
आणि नेहमीच तुझा श्वास बनून ....मी तुझ्या सोबत असेन ....

तुझ्या तळ हातांच्या रेषांत,
tension मध्ये कपाळाच्या आटयात ....
आणि तू गुनगुनत असलेल्या त्या प्रत्येक गाण्यात .... मी तुझ्या सोबतच असेन ....

तुझ्या बंद डोळ्यांतल्या स्वप्नात ...
उघड्या डोळ्यातली आशा बनून ....
आणि मनातली इच्छा बनून मी तुझ्या सोबतच असेन ...

तुझ्या ट्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात ....
तू विसरलेल्या त्या प्रत्येक आठवणीत ....
आणि तुझ्या प्रत्येक प्रवासात तुझी ..."Destination" बनून मी तुझ्या सोबत असेन ....

काल पर्यंत मी तुझ्या सोबतच होतो....
आत्ताही मी तुझ्या सोबतच आहे ....
आणि नंतरही मी तुझ्या सोबतच राहील ....

Friday, July 23, 2010

..... मित्र .....


 ..... मित्र .....



मन मोकळ करायला....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

दुःखा चा  भार हलका करायला ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

सुखा च्या दिवसांत Party करायला ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

एकटेपणा घालवायला .... सोबत ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

स्वतची चूक कबुल करायला ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

मला चुकल्यावर रागावणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

जुन्या आठवणी आणि नवीन स्वप्ने सांगणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

FaceBook च्या Photos मध्ये tag करणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

 Updated status ला comment देणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

twitter च्या twitts ला reply करणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

पावसात स्वतः थोडंसं भिजून ... मला छत्रीत घेणारं ...
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

Surprisingly Movie चा plan करणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

Shopping साठी माझ्या बरोबर अख्खा Mall फिरणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

Exams च्या वेळी लपून लपून Answer दाखवणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

रात्री १२.०० वाजता Birth -Day wish करून party मागणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

मी नसताना माझी आठवण काढणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

मी गेल्यावर माझ्यासाठी मनापासून रडणारं ....
                 आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं ....

आणि त्या आपलं कोणीतरीचं रूप ...
                 मला तुझ्या चेहर्यात दिसतं ..... 



Thursday, July 22, 2010

.... अजूनही .........

            आपल्या life मध्ये बरेच लोक येतात आणि जातातही, पण त्यातले काही लोक गेल्यावरही त्यांच्या मागे मनातली त्यांची जागा .... तो कोपरा ... मोकळा ठेऊन जातात ...जिथे त्यांच्या शिवाय कोणी दुसरा राहू शकत नाही ... तिथे शेवटपर्यंत राहतात त्या त्यांच्या आठवणी .... आणि एक वेडी आशा ... इच्छा ... त्यांची परत येण्याची .....
           अशाच एका मित्राने त्याच्या गेलेल्या मित्रा साठी लिहिलेली एक छोटीशी कविता ....




         ..... अजूनही ....

मला अजूनही असं वाटतं ...
तू जूनं  सगळ विसरून तू पुन्हा माझ्याशी बोलणार ...
आपली पुन्हा पहिल्या सारखी, 
घट्ट मैत्री होणार ...  

मी तुला चिडवनार,
तू नेहमी सारखच खोटं खोटं रागावनार ...
मग थोडसं हसून तू,
तुझा राग शांत झाल्याचं दाखवणार ....

मी कधी Tension मध्ये असताना ...
तुझा एखादा sms येणार ....
नकळतच माझ्या चेहर्या वर Smile देऊन ...
माझं Tension विसरवनार ....

आपण कधीतरी Movie चा plan करणार ...
पाहिजे ती Movie "House Full" म्हणून...
मी दूसरी चे Tickets काढणार ...
The End नंतर ती पकाऊ होती म्हणून तू मला ओरडत राहणार ...

कधी मला रडताना पाहून...
तुझं मन गहिवरून येइल, 
माझ्या पाठीवरून हात फिरवत ...
तू माझे डोळ्यातले अश्रु टिपशील ...

रस्त्याने चालता चालता ...
मी तुझ्या Call ची वाट पाहत असतो...
खरं सांगतो मित्रा .. तुझ्या आवाजातला ...
तू मला म्हटलेला Hello मला ऐकवासा वाटतो ...

कसं ना!! पटकन तू ...
मला तुझ्या लाइफ मधून काढून टाकलस,
पण तुला माझ्या लाइफ मधून काढून टाकायला ...
मला अजुन का नाही जमलं ...

तू परत येणार नाही ...
हे मला देखिल माहिती आहे ...
पण माझं मन माझं ऐकतच नाही...
तुझी वाट पाहणं थांबवतच नाही ...

मला वाटतं .... मी दिसल्यावर....
तू मागे वळून पाहशील ...
वळून पाहण्या एवढी  तरी जाणीव ...
तू आपल्या मैत्रि ची ठेवशील .... 


Saturday, July 3, 2010

..... कोणीतरी एकटा .....

 ..... कोणीतरी एकटा .....


जीवन पाण्याशिवाय,

पाणी पावसाशिवाय,

पाऊस सूर्याशिवाय,

सूर्य आकाशगंगेशिवाय,

आकाशगंगा पृथ्वीशिवाय,

पृथ्वी लोकांशिवाय,

लोक जात-धर्मांशिवाय,

जात धर्म मंदिरांशिवाय,

मंदिर देवान्शिवाय,

देव भाक्तांशिवाय,

भक्त हारांशिवाय,

हार फुलांशिवाय,

फूल सुगंधाशिवाय,

सुगंध वार्याशिवाय,

वारा झाडांशिवाय,

झाड निसर्गाशिवाय,

निसर्ग प्रेमाशिवाय,

प्रेम त्यागाशिवाय,

त्याग हृदयाशिवाय,

हृदय आपल्या माणसांशिवाय,

आपली माणसे नात्यांशिवाय,

नाती लग्नाशिवाय,

लग्न आवडीशिवाय,

आवड ओळखीशिवाय,

ओळख नावाशिवाय,

नाव कोणातरी शिवाय

आणि...

कोणीतरी तुझ्याशिवाय ..... 

एकटा आहे ......

Friday, April 9, 2010

..... प्रिये तुझ्या साठी ....


..... प्रिये तुझ्या साठी ....


प्रिये तुझ्या आठवनित  काल चालत होतो ...
तेव्हा एका Bike ने मला ठोकले ...
हाताला जखम झाली आणि भरपूर रक्त वाहू लागले ...
रक्त वाया जाऊ नए म्हणून,
मी त्यानेच Love letter रखडले ...

या सगळ्या लफड्या नंतर...
मी डॉक्टर कड़े गेलो ...
त्याने पाच टाके लावले आणि,
बिलाचे पाचशे रूपये घेतले ...


प्रिये तू माझ्यात interested आहेस या नादात ...
मी नेहमीच तुला call करत राहिलो...
तुझा Reply नाही आला ...
तरीही मी SMS करत आहिलो ...
महिन्याभाराचा balance माझा,
आठवडयातच संपायला लागला ...

प्रिये तुझ्या साठी...
मी गुलाबाचं झाड लावणार आहे,
तुझा मला होकार असेल तर ...
तुझ्या केसांत गुलाब लावणार ...
नाहीतर फूलवाला बनून ...
माझे balance चे पैसे वसूल करणार आहे ...

प्रिये तुला भेटायला मी तुझ्या घरी येणार आहे ...
तुझ्या घरातल्यांना मी आवडलो तर ...
तुला मी perfume gift देणार ...
आणि नाही आवडलो तर salesman बनून ...
फेनोइल आणि Detergent विकून माझे...
Perfume चे पैसे वसूल करणार आहे ...

प्रिये तुझ्या आठवनित मी ...
एक chicken shop उघडणार आहे ...
तुझ्यावरचा राग ...
मी तिथल्या कोम्बड्यां वर काढणार आहे ...
पण तिथल्या अंड्यांना मी ...
माझ्या मनातल्या प्रेमासारखी जपनार आहे ...

बघ तुला आठवतात काय ते Pizza Hut's चे pizzas ...
आणि CCD 's च्या coffees ....
Natural's च्या त्या ice -creams ...
आणि मी तुला सांगितलेल्या त्या माझ्या Day dreams ...

प्रिये आपली झालेली प्रत्येक भेट ...
मला सुखद आठवण देऊन गेली ...
पण प्रत्येक वेळी माझ्या पाकिटातली ...
at least १०० रुपयांची नोट घेउन गेली ....


Saturday, March 13, 2010

.... हीच Engineering आहे तर ....

.... हीच Engineering आहे तर ....

"यही ज़िन्दगी हैं तो क्या ज़िन्दगी हैं ...." ह्या traffic signal मधल्या गान्यावरून काहीसं inspired होउन मी ही कविता लिहली आहे ...

.... हीच Engineering आहे तर ....


.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?
कुठे admissions च्या रांगेत सुरु होते ...
कुठे घरांत पुस्तकांची रद्दी वाढवते ...
कुठे रॉकेल xerox च्या वासात गुदमरते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?

कुठे mechanics बनून Friction करते ...
कुठे maths बनून integrate करते ...
कुठे probability बनून सांभाळुन घेते ...
कुठे chemistry च्या reactions करते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?

कुठे physics चे laws विसरते ...
कुठे transistor च्या emitter- collector मध्ये confuse होते ...
कुठे frequency bands मध्ये अड़कुन पड़ते...
कुठे physical memory नेहमीच full असते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?

कधी assignments बनून बरसत असते ...
कधी free lecture साठी तडपत असते ...
कधी submissions च्या वेळी वाट लावते ...
कधी लिहून लिहून बोटांना फोड़ आणते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?

कधी चालु lecture मध्ये झोपते ...
कधी रात्री रात्री जागवून घालवते ...
कधी वेळे पेक्षा जोरात धावते ...
कधी अशीच थांबून धावत्या वेळेकडे पाहत राहते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?

कधी KT बनून दुखावत राहते ...
कधी Golden attempt बनून सतावते ...
कधी circuit मधल्या current सारखी भटकत राहते ...
कधी drop बनून भरपूर रडवते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?

कधी vivas च्या वेळी निःशब्द करते ...
कधी practicals च्या वेळी साध्या साध्या readings चुकवते ...
कधी theory exams साठी रात्रं दिवस जागवते ...
तरी papers मध्ये कुठेतरी काहीतरी कमी राहते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?

कधी results च्या वेळी भीती ने घाबरवते ...
कधी तुटलेल्या स्वप्नांत टोचत राहते ...
कधी job साठी डोळ्यांत पाणी आणते ...
नेहमीच future च्या प्रश्नांत present ला मागे सारते ...

.... हीच Engineering आहे तर ....
ही काय इंजीनियरिंग आहे ...?..... 




Monday, March 1, 2010

..... या जगात सगळ्यांनाच .....



 ..... या जगात सगळ्यांनाच .....




या जगात सगळ्यांनाच हवं ते भेटत नसतं ....
आणि तरीही भेटनार्या गोष्टींमागे मन का धावत असतं ?...
कधी जमिनीवर तर...
कधी उंच ढगांतच compromise करावं लागतं .... 
इथे सर्वच जण स्वताच्या धुंदीत असतात ....


शब्द बरेचसे अड़कुन पडलेत ...
मनाच्या कोपर्यात ....
पण त्याना मोकळं करायाला ...
मित्र कुठेच नसतात ....


आकांशा सगळ्यांच्याच ...
भरपूर मोठ्या असतात ... 
त्यांना पूर्ण करायला इथे सगळेच
दुसर्यांचा वापर करतात ...
पण आपल्या मदतीसाठी इथे क्वचितच ...
लोक आपल्याला भेटतात ...


स्वप्न पहायला रात्रीची झोप कमी पड़ते ...
त्यांना पूर्ण करायला दिवस भरची मेहनत कमी पड़ते ...
होतात स्वप्न पूर्ण तेव्हा ....
... जेव्हा ज्यांच्या बरोबर पाहिली
त्यांची कमी जाणवते ....


सगळ्यांनाच होतं प्रेम जगात ...
त्याची इथे काही कमी नाही ...
पण ज्यांच्या कडून असते अपेक्षा प्रेमाची ...
त्यांच्या कडून ते प्रत्येकाला भेटतच असं नाही ...


स्वप्नात आकाशातले तारे हातात दिसतात ...
पण reality मध्ये ... दिवसाच्या उजेडात ...
डोळ्यांसमोर अंधार दाटतो ...
आणि रात्रीचा चंद्र सुद्धा आगीच्या गोळ्यासारखा भासतो ...


होय ... सगळ्यांच्या म्हनण्याप्रमाने ...
वेळ नक्कीच सगळं normal करेल ...
पण गेलेल्या वेळेला Rewind मध्ये जावून ...
कोणी कसं change करेल???